तो होता हासत नाचत
विसरुनिया भान सारे
आणिक होता छेडित सूर
अंतःकरणास भिडणारे
क्षणाक्षणांच्या उन्मादांना
जात होता सामोरा
पण कधी नसेलच उर्मी
खुशाल होई पाठमोरा
तनामनांच्या मर्यादांच्या
होता भोगत वेदनाही
परि आवेगे ढाळीत अश्रु
होत होता मोकळाही
सुखाच्या अन् दुःखाच्या
जरि होता तो अंकित
नव्हती अज्ञानाची जाणीव
की क्षणभंगुराची भीत
या अशा बेभान रंगी
जाहला दृष्टांत अवचित
शाश्वताचे अशाश्वताचे
जसे उमगले गुपीत
थबकले पाय थिरकणारे
अन सूर ते गाणारे
न उरले अश्रु आणिक
आवेगाने पाझरणारे
नुरले सुख नुरले दुःख
उरले कोरडे दर्शन आत
आगंतुक दृष्टांताची ही
असली जीवघेणी किंमत
2 comments:
Nirajbhau, tumchi kavita 'peshva jaywant' chya valnavar jaate aahe ki kaay? One trait that i admire in you is crystal clear thinking - that gets reflected in your writing-esp. in articles. Mag ashi thodi durbodh kavita kashi suchali? may be u can share the context / inspiration for this work..
अरे अरे न्याना झालासी पावन
तुझे तुज रूप कळो आले
किंवा
अणुहुनिया तोकडा तुका आकाशा एव्हडा
आणि तुझा हा दृश्टांत एकाच जातीचे
असे सापडते अचानक पिंपळाचे झाड
समयाच्या कणा मधे सगळ्यांनाच कधी ना कधी
तसे आपण सारेच क्षणभराचे बुद्ध!
छान!
Post a Comment